भुगांव गणात अनिल पवारांची प्रचारात मुसंडी, शहरी आणि ग्रामीण मतदारांचा कौल मशालीकडे

भूगाव:  “गावकी-भावकीच्या राजकारणापलीकडे सुसंस्कृत चेहरा आणि तालुक्याच्या विकासाचे व्हिजन असलेला अनिल पवार यांनी भूगाव पंचायत समिती गणात प्रचारात मुसंडी मारली आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांचा कौल अनिल पवारांच्या बाजूने झुकला आहे. 
निवडणुका आल्यावर सगळेच आमच्याशी संपर्क साधतात. काही जण तर आमीषही दाखवतात; पण आमच्या भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्हाला कार्यक्षम आणि सुसंस्कृत नेताच हवा आहे. आमच्या मुलांना योग्य शिक्षण आणि वाचनाचे महत्त्व आज अनिलबापुमुळे समजतंय. त्यांनी आयोजित केलेल्या करिअर गायडंस शिबिरामुळे आज आमच्या मुलांना योग्य दिशा मिळाली. आम्हाला वाचणारा आणि वाचायची प्रेरणा देणारा असा सुसंस्कृत उमेदवारच हवा आहे”, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया भुगाव-भुकूम आणि गणातील अनेक गावांत-वाड्या-वस्त्यांत ऐकायला मिळत आहेत.

राजकारण सध्या गचाळ झाले आहे. पण अंधारातही प्रकाशाचा एक कवडसा आशा जागवतो, तसा अनिल पवारांनी हाती घेतलेल्या मशालीमुळे भुगाव पंचायत समिती गणात मतदारांच्या मनात आशेचा प्रकाश निर्माण झाला आहे. वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध झालेल्या मुळशी तालुक्यात वाचन-संस्कृतीसारखे उपक्रम राबवणार्या आणि जमिनीवर अफाट काम उभे करणाऱ्या अनिल पवारांनाच पालकांची पसंती मिळत आहे.

याविषयी बोलताना अनिल पवार म्हणाले, “भुगाव पंचायत समिती गणातील पालक अत्यंत जागरूक आहेत. आपल्या मुलामुलींच्या भविष्याची त्यांना काळजी आहे. मी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आजवर केलेल्या कामामुळे पालक माझ्या पाठीशी ठाम उभे राहत आहेत. खाटपेवाडी येथे प्रचारासाठी गेलो असता, सानवी स्वप्नील खाटपे या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने तर मला सुखद धक्काच दिला. मी लिहिलेल्या “रामनदी आणि भवताल’’ या पुस्तकाच्या प्रत्येक पानाचा सारांश तिने तिच्या डायरीत नोंदवला आहे. विशेष म्हणजे, तिनं पूर्ण पुस्तक अभ्यासले. रामनदी खोऱ्याचा इतिहास, भूगोल, संस्कृती, ग्रामदैवते, शहरीकरणाच्या रेट्यात ढासळलेला गावगाडा याविषयी मी पुस्तकात लेखन केलं आहे. सानवीने इतक्या लहान वयात माझ्याशी या सर्व पैलूंवर चर्चा केली. तिची ही अभ्यासू वृत्ती, आपल्या परिसराविषयी असलेली आत्मीयता पाहून मी भारावून गेलो. अशी वाचणारी सजग पिढी निर्माण झाली, तर आपल्या मुळशी तालुक्याचे भवितव्य खूप उज्ज्वल असेल, असा मला विश्वास वाटतो. ही निवडणूक या गुणवान, संवेदनशील भावी पिढ्यांच्या भवितव्याची लढाई आहे, असेही अनिल पवार म्हणाले.
See also  खळबळजनक…मुळशीचे तहसीलदार रणजीत भोसले  निलंबित, सातबारा दुरुस्तीमध्ये अनियमितता भोवली