ग्रंथतुलाने माजी खासदार अशोक मोहोळांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा, अमृत महोत्सवनिमित्त मीरा मोहोळांचा गौरव , शीला मोहोळांचा विशेष सत्कार

महावार्ता न्यूज ः-  नामदेवराव मोहोळ विद्या व क्रिडा प्रतिष्ठान आणि मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मामासाहेब मोहोळ यांची ११९ वी जयंती, माजी खासदार अशोक मोहोळ यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा, मीरा अशोक मोहोळ यांचा अमृत महोत्सव सोहळा आणि शीला सदानंद मोहोळ यांचा विशेष सत्कार आज आयोजित करण्यात आला होता.

यशवंतराव आणि वसंतराव यांच्या संस्कारांमध्ये घडलेले मामासाहेब मोहोळ आणि मामासाहेब मोहोळांच्या शिकवणीत मोठी झालेली आमची राजकीय पिढी यांनी राजकीय संस्कृतीचा आदर्श निर्माण केला होता. मात्र, सध्या देशहित केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणाऱ्या पिढीचा अभाव दिसत आहे, अशी खंत ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अशोक मोहोळ यांनी व्यक्त केली.  यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विदूर तथा नानासाहेब नवले, ज्येष्ठ विचारवंत आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पुरंदर विधानसभेचे आमदार संजय जगताप, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे, ज्येष्ठ साहित्यिका अश्विनी धोंगडे आणि माजी आमदार कुमार गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अशोक मोहोळ यांची ग्रंथतुला करण्यात आली.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, अलीकडे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्याची पातळी दिवसागणिक खालावत चालली आहे. राजकारण हे शालीन आणि सात्विक देखील असू शकते, याचा वस्तूपाठ मामासाहेब मोहोळ, अशोक मोहोळ आणि त्यांच्या पुढच्या पिढीने घालून दिला आहे. ”यशवंतराव स्कूल”मध्ये घडलेली ही पिढी खऱ्या अर्थाने २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करीत होती. लोकशाहीत मतभिन्नता असू शकतो, मात्र ती मतभिन्नता शत्रूत्वाच्या पातळीवर जाणे, हे अधःपतन आहे. महाराष्ट्राने सातत्याने सामाजिक, उद्योग-व्यवसाय, सांस्कृतिक, आर्थिक आदी पातळ्यांवर देशाचे नेतृत्व केले. देशातील इतर कोणत्याही राज्यात कोणतेही संकट आल्यास किंवा अडचण उद्भवल्यास महाराष्ट्राने त्यावर काय तोडगा काढला आहे, हे पाहण्यासाठी संबंधिक यंत्रणा महाराष्ट्रात दौरे करायची. परंतू, आता उलट चित्र पहायला मिळत आहे, ही खेदाची बाब आहे.
यावेळी संजय जगताप, संग्राम थोपटे, अश्विनी धोंगडे आणि कुमार गोसावी आदींनी मनोगत व्यक्त केले.
मुळशी हवेलीतील सर्व पक्षीय पुढारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ, कुणाल मोहोळ, सचिन पवळे व सी एस मोहोळ यांनी उत्कृष्ट नियोजन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भामरे यांनी केले. बाळासाहेब गांजवे यांनी आभार मानले
See also  आवाज कोणाचा आस्मि विचारमंचाचा….नवे अध्यक्ष अ‍ॅड. खामकरांचे अ‍ॅड. रवि शिंदेेंकडून कौतुक